बहुजननामा ऑनलाईन टीम : अनेक दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाट्य आता अंतिम टप्यात आलं आहे. काल मंगळवारी संध्याकाळी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकासआघाडीला सरकार स्थापनेचा निकाल मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेल ट्रायडेंटमध्ये या तिन्ही पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार उद्या मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुद्दा मार्गी लावणार असल्याची चर्चा आहे. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असणार बोललं जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Abdul Sattar, Shiv Sena: Our priority will be to waive loans to farmers in the first cabinet meeting itself. Except a few people, rest of the Maharashtra is happy today. I should not be making comments on why Ajit Pawar joined hands with BJP, rest Sharad Pawar can comment on him. pic.twitter.com/AoOTwLmYE4
— ANI (@ANI) November 26, 2019
दरम्यान, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्य सरकार २५ टक्के निधी देणार आहे. त्यापोटी ५००० कोटी रुपये द्यावे लागतील. दरम्यान शिवसेनेच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा होता , त्यामुळे आता ठाकरे सरकार आल्यानं हा प्रकल्प पूर्ण होणार कि त्याकडे दुर्लक्ष करण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होईल. कारण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची गरज काय, यातून गुजरातला जास्त फायदा होणार, अशी टीका या प्रकल्पावर पहिल्यापासूनच होत होती. विरोधकांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतले होते.
Visit : bahujannama.com