मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपा -शिवसेना यांची युती व्हावी , यासाठी मी नेहमी प्रयत्न शील आहे .मात्र युती झाली नाही ,तर शिवसेनेचंच जास्त नुकसान होईल,असे रिपाइ चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे .दक्षिण मद्य मुंबई च्या जागेसाठी शिवसेनेशी बोलणी करणार असल्याचेही ते म्हणाले. लोकसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त करताना ते म्हणाले , मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे ,आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.
वंचित बहुजन आघाडीवर रामदास आठवलेंनी जोरदार टीका केली . वंचित बहुजन आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे .वंचितांना सत्तेसाठी एकत्र यायचे असेल तर त्यांनी माझ्यासोबत यावं. कारण वंचित आघाडीसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही तसेच वंचित आघाडीच्या मतांचा फायदा महायुतीलाच होईल असा दावा आठवले यांनी केला.
शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवरही आठवले यांनी भाष्य केले. पवार साहेब लोकसभेत येणार असतील तर आनंदच आहे . मी लोकसभेत जाणार , मग पवार साहेब एकटे राज्यसभेत कसे राहतील? असा मिश्किल सवालही त्यांनी केला .
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चालल्याबाबत आठवलेंनी चिंता व्यक्त केली . मराठी माणसाने उदयॊग ,व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे .आपण घर सोडायला तयार नसतो ,चिकाटीने काम करत नाही ,त्यामुळे उत्तर भारतीय येऊन ती काम करतात ,असं म्हणत आठवलेंनी मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळण्याच आवाहन केलं