पटना वृत्तसंस्था : एक रुपये प्रति किलो काजू आणि मनुके… हे अगदी खरं आहे. बिहारमधील एका शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत वस्तू पुरवणार्या एका एजन्सीने हा दर ठरविला आहे. त्याचवेळी ५ रुपयाला मिळणार अंड १६ रुपयांचे आहे. ८०० रुपये प्रति किल ने विकला जाणारा काजू १ रुपये किलो ने विकला जातो. एका अधिकाऱ्याने केलेल्या तपासानंतर हा काळाबाजार समोर आला आहे. सर्व शिक्षा अभियानाचा हा अनोखा बाजार आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर, येथील कस्तूरबा गांधी विद्यालयात सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून एक अन्न पुरवठा एजन्सी काम करत आहे. एजन्सीने काजूला एक रुपये प्रतिकिलो, मनुका १ रुपये, अंडी १६ रुपये, हरभरा डाळ १९९ रुपये प्रतिकिलो, आणि हरभरा १ रुपये किलो ठेवला आहे.
लसूण एक रुपये प्रतिकिलो, वेलची एक रुपये प्रतिकिलो, हरभरा एक रुपये प्रति किलो. सामानाच्या दराच्या स्वस्त आणि महागड्या वस्तूंची लांब यादी आहे. राजेश कुमार नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने सर्व शिक्षा अभियानाकडे तपशील मागितला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सर्व शिक्षा अभियानाच्या डीपीओच्या अध्यक्षतेखाली समितीने पुरवठा करण्याचे हे कंत्राट एका एजन्सीला दिले आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कस्तूरबा गांधी निवासी शाळेत ही एजन्सी विचित्र दराने सामानाचा पुरवठा करीत आहे. एजन्सीने वस्तूंची किंमत एक रुपयावर निश्चित केली आहे, जी ती पुरवत नाही आणि ज्या वस्तूंचा पुरवठा होतो त्यांचे दर दुप्पट करून हा खेळ चालवला आहे. खरं तर, विभाग त्या एजन्सीला पुरवठा करण्याचा ठेका देत असतो, जो बाजारपेक्षाही कमी किंमतीत अन्न पुरवठा करते. विभाग आणि एजन्सी मिळून दरमहा लाखोंची कमाई करत आहे. यासंबंधी अधिक तपास सुरु आहे.