नवी दिल्ली : वृत्त संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या खात्यातून सुमारे 147 रुपये कापत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. अखेर कोणतेही ट्रान्जेक्शन न करता पैसे का कापण्यात आले यामुळे अनेकजण अस्वस्थ आहेत. हे पैसे का कापले जात आहेत याची माहिती जाणून घेवूयात…
का कापले जात आहेत पैसे ?
अनेक एसबीआय खात्यातून पैसे कापले जात आहेत आणि हे पैसे एसबीआयकडूनच डेबिट केले जात आहेत. होय, लोकांच्या खात्यून 147 रुपये एसबीआय कापून घेत आहे आणि याचे कारण त्यांचे चार्जेस आहे. बँक एटीएम म्हणजे डेबिट कार्डसाठी मेन्टनंस चार्ज कापते. हा चार्ज प्रत्येक वर्षी बँकेकडून ग्राहकांच्या खात्यातून कापला जातो. बँकेने ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, बँकेकडून चार्ज म्हणून 147.50 रुपये कापले जात आहेत.
नुकतीच एका व्यक्तीने आपल्या खात्यातून पैसे कापले गेल्याची माहिती ट्विटरवर दिली होती. यानंतर एसबीआयने या ट्विटला उत्तर दिले आणि सांगितले की, कोणत्या कारणामुळे पैसे कापले गेले आहेत. बँकेकडून देण्यात आलेल्या उत्तरात लिहिले आहे की, प्रत्येक वर्षी ग्राहकांना दिल्या जाणार्या एटीएम कम डेबिट कार्डचा मेन्टनंस म्हणून 147.50 रुपये डेबिट केले जातात. जर तुमच्या खात्यून पैसे कापले गेले तर लक्षात ठेवा की, हे मेन्टनंस फी म्हणून कापण्यात आले आहेत.