मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्यात अनेक दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री हा आमचाच होणार यावर शिवसेना अडून बसली आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी नुकताच महाराष्ट्रात २५ वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री व्हावा अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेच्या वेळी संजय राऊत यांना विचारले की, महाशिवआघाडीच्या सत्तेत शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पाच वर्षासाठी असेल काc? अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर शिवसेना पुढे जाईल. यावर राऊत म्हणाले की, तुम्ही पाच वर्षे काय , शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात २५ वर्षे रहावेत अशी आमची इच्छा आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut on being asked 'if Shiv Sena CM will be for 5 years or CM will be for 2.5 years each from NCP and Shiv Sena?': Hum toh chahte hain aane wale 25 saal tak Shiv Sena ka CM rahe, aap 5 saal ki baat kyun karte ho. pic.twitter.com/ZH69LUDoTG
— ANI (@ANI) November 15, 2019
बुधवारी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधून उपचारानंतर परतल्यावर संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांविषयी विधान केले आहे. राऊत म्हणाले की, राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल. दरम्यान ११ नोव्हेंबरला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर, शिवसेनेबरोबर बंद खोलीत घडलेल्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविल्या नव्हत्या, अन्यथा या परिस्थिती उद्भवल्या नसल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर केला.राष्ट्रपती राजवटीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या बैठकीत एक मसुदा तयार करण्यात आला असून त्यानुसार पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे.
कॉमन मिनिमम प्रोग्रामवरुन तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४ आणि कॉंग्रेसला १२ मंत्री देण्यात येणार आहेत. स्वत: शिवसेनेकडे १४ मंत्री पदे असतील.तर दुसरीकडे भाजपमध्ये बैठका सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य ज्येष्ठ नेते सरकार स्थापनेसाठी मंथन करीत आहेत. बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत पहिल्यांदाच सर्व भाजपकडून निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पक्षाला पाठिंबा देणारे सर्व अपक्ष आमदारही उपस्थित होते.
Visit : bahujannama.com