नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशाच्या अनेक भागातून शेतकरी सतत आपला विरोध दर्शवत आहेत. शेतकर्यांची मागणी आहे की, नवीन कायदे रद्द करावेत. शेतकर्यांच्या या आंदोलनाला अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका महिला शेतकरी नेत्याचा व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यांचे आंदोलनादरम्यान सँडल चोरीला गेले आहेत.
वायरल झाला व्हिडिओ
हा व्हिडिओ ग्रेटर नोएडा येथील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये स्वत: शेतकरी नेता असल्याचे सांगणारी एक महिला म्हणते, माझे नाव ठाकूर गीता भाटी आहे. किसान संघाची महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारच्या षडयंत्रानुसार माझ्या पायातील सँडल पळवण्यात आले, जेणेकरून मी पुढील लढाई लढू नये. परंतु, मी उघड्या पायांनी लढेन. मी एफआयआर दाखल करेन या लोकांच्या विरोधात. तसेही खाण्यासाठी काही नाही. उघड्या पायांनी चालत होतो आणि जसे चालण्यासाठी चप्पल उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यासुद्धा पळवल्या, आता त्या कोण देणार? या सरकारने माझ्या सँडल परत द्याव्यात.
यापूर्वी शेतकर्यांचे अर्धनग्न आंदोलन
सोमवारी नवीन कृषी कायद्याविरोधात दलित प्रेरणास्थळावर पाच दिवसांपासून धरणे आंदोलन करणार्या भारतीय किसान युनियन (लोक शक्ती) च्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी अर्धनग्न होऊन दिल्लीसाठी पायी मार्च काढला. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्यांना डीएनडीकडे जाण्यासाठी रोखण्यात आले, तेव्हा शेतकरी कालिंदी कुंज बैराजकडून दिल्लीला जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना तिथेही रोखले.