मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला बिग बॉग (Bigg Boss) या रिॲलिटी शोचा १५ वा सिझन ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि अली गोनीने अनुक्रमे रुबीना दिलैक आणि जस्मिन भसीन यांच्यासोबत जोडी जुळवत प्रेमाचे रंग उधळले होते. त्यामुळे सलमान खान हा सिझन कपल शो करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसे जर झाले तर कोणत्या जोड्यांना आमंत्रित करण्यात येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसचा १५ वा सिझन कपल शो करण्याची शक्यता असून सेलिब्रिटी कपलसोबत काही सर्वसामान्य जोड्यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यावर चर्चा सुरु आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी काही स्पर्धक अनेकदा वाद निर्माण करतात. किंवा अशा काही कृती करतात की त्यांना आपसूकच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे सलमान खान नाराज झाला आहे. त्याच्या मते, या कार्यक्रमाला कौटुंबिक लुक मिळायला हवा जसे की,’ हम आपके है कौन’ सारखा ग्लॅमरस आणि ‘हम साथ साथ है’ या सारखा.
खतरों के खिलाडीमधील स्पर्धकांचाही समावेश ?
या कार्यक्रमाची क्रिएटिव्ह टीम सलमान खानला जे वाटते ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या केपटाऊनमध्ये या चॅनेलचा ‘खतरों के खिलाडी ११’ हा कार्यक्रम सुरू आहे. बिग बॉस च्या कार्यक्रमासाठी त्यातील काही कलाकारांचे नाव जोडण्याचा विचार सुरू आहे. तसेच प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियानुसार या कार्यक्रमात कोणाला सहभागी करायचे आणि कोणाला नाही त्यावर निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, बिग बॉसचा १५ वा सिझन हा कपल स्पेशल असल्याचे समजताच ज्या कलाकारांचे अलिकडेच लग्न झाले आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या निर्माता कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना फोन करून कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी ज्यांची नाते तुटली आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांनाही या कार्यक्रमास सहभागी करून घेण्यात येणार आहे. या सिझनसाठी ३० लोकांची निवड केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एकूण ३० लोकांची निवड केली जाणार असून पहिल्यापासून कोणते कपल यात असणार आहेत किंवा कोणत्या कपलला वाईल्ड कार्ड एंंट्रीने कार्यक्रमात सहभागी करुन घ्यायचे यावर कार्यक्रमाची टीम विचार करत आहे.