बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषि विषयक कायदे मागे घेण्यावरुन गेल्या ४० दिवसांपासून अधिक काळ आंदोलन सुरु असताना आता रिलायन्सने(Reliance) एक परिपत्रक काढून खुलासा केला आहे.
रिलायन्सने(Reliance) काढलेल्या परिपत्रकात आमचा कंत्राटी शेतीशी संबंध नाही. आम्ही कधीही शेत जमीन खरेदी करणार नाही. आम्ही कधीही थेट शेतकºयांकडून खरेदी करणार नाही. आमचे पुरवठादार हे शेतकºयांकडून हमी भावात धान्य खरेदी करतील. शेतकर्यांच्या समुद्धीसाठी रिलायन्स कटीबद्ध आहे.
पंजाब, हरियानामध्ये काही असामाजिक तत्वांकडून तोडफोड करण्यात येत आहे़ त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
केंद्र सरकारने जे तीन नवीन कृषि कायदे केले. हे कायदे अदानी, अंबानी यांच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अदानी यांनी त्यासाठीच याअगोदर जमिनी खरेदी करुन गोदामे उभारली आहेत. रिलायन्सने नुकतेच रिटेलमध्ये उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पाठोपाठ केंद्र सरकारने विरोधकांचा सर्व विरोध मोडून हे तीन कृषि कायदे मंजूर करुन घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी पंजाब व हरियानातील शेतकर्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्याला आता ४० हून अधिक दिवस होऊन गेले आहेत.
कडाक्याची थंडी आणि पाऊस याच्याशी सामना करीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांचा आता संयम सुटत चालला आहे. रिलायन्सविरोधात शेतकर्यांचा संताप समोर आला असून पंजाब व हरियाना येथे रिलायन्स मोबाईलची शेकडो मोबाईल टॉवरची तोडमोड करण्यात आली आहे. हे आंदोलन चिरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांचा संताप आवरण्यासाठी रिलायन्सने हे परिपत्रक काढले आहे.