बहुजननामा ऑनलाइन टीम – नववर्षाचे स्वागत धूमधकाड्यात आणि जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता यावा या करिता सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अट 31 डिसेंबर रोजी एक दिवसापूरती शिथिल करावी, मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. दिवसा एकत्र फिरल्यावर कोरोना होत नाही, रात्रीचा संचार केल्यावरच कोरोना होतो हा कोणता शोध सरकारने लावला, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागत जोषात करणार आहोत, असे इशाराच मनसेने सरकारला दिला आहे. त्यामुळे, सरकार मनसैनिकांच्या भावनांचा विचार करणार की रस्त्यावर उतरणाऱ्यांवर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान राज्यात महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्य़ंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. परंतु या सांचारबंदीला मनसेने विरोध केला आहे. अनेक तरुण मंडळी तसेच हौशी लोक मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी करीत आहे ही मागणी लक्षात घेता तसेच वर्षभर सण उत्सव हे निर्बंधातच गेल्याने एका दिवसापुरती हा निर्बंध उठवावे अशी मागणी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केली आहे.