मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हिंदुत्वाचे मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी काल त्यांच्या भाषणात टीका केली होती. त्यांनतर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच सावरकरांना भारतरत्न (BharatRatna) द्यावा, ही आमच्या कुटुंबाची मागणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रणजित सावरकर राहुल गांधींची (Rahul Gandhi) टीका करत म्हणाले, “सावरकरांची बदनामी केलीने आपल्याला मत मिळत, असे राहुल गांधींना वाटते. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत. त्यांनी याआधीही असे उद्योग केले आहेत.” ते दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “जर शरद पवारांवर (Sharad Pawar) एक ट्वीट रिट्वीट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं जात असेल तर राहुल गांधींना अटक केली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकरांचा असा अपमान होणार असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
संजय राऊतांनी (Sanjay Raut) सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती,
त्या बद्दल बोलताना रणजित सावरकर म्हणाले, “सावकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचा संजय
राऊतांना काही अधिकार नाही. त्यांचे सहकारी पक्ष रोज सावरकरांना शिव्या देत आहेत.
त्यांनी जेव्हा अश्लील लेख लिहिला होता, तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)
भेटण्यासाठी गेलो होतो. मला भेट नाकारण्यात आली. जे पत्र दिलं त्याला उत्तर देण्याचं सौजन्य नाही.
तुम्ही साधं तुमच्या सहकारी पक्षांना सांगू शकत नाही. सत्तेच्या मोहासाठी तुम्ही बदनामी खपवून घेता.
आमच्या कुटुंबाने भारतरत्न देण्याची कोणतीही मागणी केलेली नाही आणि करणारही नाही.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Rahul Gandhi | ranjit savarkar demands arrest of congress rahul gandhi over his statement on veer savarkar
हे देखील वाचा :
Gangster Chhota Rajan | पुराव्यांअभावी कुख्यात गुंड छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता
Maharashtra Politics | “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर…” राहुल गांधींचे महाराष्ट्र सरकारला आव्हान