बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीने पिकांची हानी किती झाली ? याचे प्राथमिक अहवाल शासकीय यंत्रणांकडून तयार झाले आहेत. पुण्याच्या(Pune) जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालात तेरा तालुक्यातील एकोणीस हजार हेक्टर्स शेती पाण्याखाली आहे. बारामती(Pune) आणि इंदापूर तालुक्यात शेतांमध्ये अजूनही पाणी साचले असल्याने कृषी खात्याचे अधिकारी पोहोचू शकलेले नाहीत. चार पाच दिवसांनंतर तिथे पिकांची पहाणी केल्यावर नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, पिकासाठी कर्ज काढले. तडाखा बसल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. इंदापूर तालुक्यात खरीप पिकाची हानी झाली आहे. जुन्नर, बारामती तालुक्यात द्राक्ष पिकाची हानी झाली आहे. मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातभातशेतीचे नुकसान झाले आहे.
दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या तोंडावर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.