बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे परंतु त्याचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसुन येत नाहीत.कोरोनाच्या काळात सुरूवातीपासून पत्रकार प्रशासनास सहकार्य करीत असल्याने राज्यात आनेक ठीकाणी पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग होउन काहींनी जीव देखील गमावलेला आहे. पत्रकारामध्ये कोरोनाची वाढती संख्या व विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्यात यावी याबाबतचे निवेदन पूणे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना देण्यात अले असुन याबाबत त्यांचेशी सविस्तर चर्चाही करण्यात आली.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.तर निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.जयश्री कटारे यांनाही हे निवेदन देण्यात आले.
कोविड-19 ने बाधित होणार्या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी याबाबतचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघानी द्यावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले होते.त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तातडीने निवेदन देण्यात आले आहे.यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर ,परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार,जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज,कार्यकारीणी सदस्य दादाराव आढाव,अमित टाकळकर,हवेली पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले,संघटक सुनील सुरळकर (धिवर) ,प्रमोद गव्हाणे यांनी निवेदन देवुन पत्रकार संघाच्या मागण्यांबाबत जिल्हाधीकारी यांचेशी चर्चा केली.
राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुंटुंबियांना राज्यशासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे ५० लक्ष रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी तसेच पुणे येथे कोरोनामुळे मृत्यू पावलेले तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने झाला आहे.रायकरांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील माध्यम जगतात उमटली.रायकर यांना अॅम्बुलन्स मिळाली असती आणि त्यांना ऑक्सीजन मिळाला असता तर एक तरूण,उमदा पत्रकार आपणास सोडून गेला नसता.याला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली.
जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन वरिष्ठांना तातडीने कळून पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका घेवू असे आश्वासन दिले.
————————————————————————