पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महामार्गावर सुरू असणारे अपघातांचे सत्र कायम असून, नवीन कात्रज बोगद्याजवळ दरी पुलाच्या येथे भरधाव दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री हा प्रकार घडला आहे.
अरमान शब्बीर शेख (वय २०, रा.नाईक चाळ, बोपोडी) आणि ॠषिकेश सुरेंद्र जाधव (वय २३,रा. गुरूदत्तनगर, पिंपळे गुरव) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही मित्र असून, ते गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून पुण्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर दरी पुलापासून काही अंतरावर भरधाव वेगात असलेल्या शेखची दुचाकी वळणावर घसरली. त्यामुळे शेख व सहप्रवासी जाधव यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.