बहुजननामा ऑनलाइन टीम –राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आजपासून सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर भटकंती करता येणार नसून सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
बारामती आतापर्यंत 1400 हुन अधिक बाधीत रूग्ण सापडले असून त्यामध्ये 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपासून बारामतीतील मेडिकल आणि दुध वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. शहराबाहेर किंवा आत प्रवेश दिला जात नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 15 दिवसांच्या लॉकडाउनला व्यापार्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निणर्यावर विचार करुन 7 दिवसांता जनता कर्फ्यू लागू केला आहे.