सातारा : बहुजननामा ऑनलाइन – करपेवाडी ता. पाटण येथील भाग्यश्री संतोष माने या युवतीचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवार दि. २२ रोजी घडली होती. तिच्या कुटुंबियांची राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी युवा नेते राहुल चव्हाण, भाग्यश्रीचे वडील संतोष माने व कुटुंबीय तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवारी करपेवाडीतील शिवारात अज्ञातांनी भाग्यश्रीचा गळा चिरून खून केला होता. यामुळे माने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठीआ. चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी आ. चव्हाण यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस तपास यंत्रणेस याबाबत सूचना करू, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबियांना दिली. भाग्यश्री मानेच्या खूनानंतर नाभिक समाज आक्रमक झाला असून आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी केली जात आहे. यामागणीसाठी सर्वच ठिकाणी आंदोलने होते आहेत.