बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ ऑगस्टला किसान पेंशन योजना बाबत घोषणा करतील अशी आशा वर्तवली जात आहे. कृषी सचिवांनी राज्यात पत्र लिहून स्कीम लागू करण्यासाठी मॅकॅनिजम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या पेन्शन स्कीमचा फायदा जवळपास १२ ते १३ करोड शेतकऱ्यांना होणार आहे. सरकार पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकऱ्यांपर्यत ही स्कीम पोहचवणार आहे. १८ ते ४० वर्षाच्या शेतकऱ्यांना या स्कीमचा फायदा मिळणार आहे. त्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. जर यादरम्यान लाभार्थाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळत राहणार. या योजनेवर १० हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे.
काय आहे ही योजना
पंतप्रधान किसान पेंशन योजने अंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षी ३००० रुपयांची पेंशन मिळणार आहे. या योजनेचा लाभ १२ कोटी लोकांना होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा १८ ते ४० असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असेल. वयाच्या ६० वर्षानंतर ३ हजार रुपये शेकऱ्यांना पेंशन देण्यात येईल. यामध्ये १८ वर्षांच्या शेकऱ्यांना प्रतिमहा १०० रुपये देणे अनिवार्य आहे.
जर शेतकरी दरमहा १०० रुपये जमा करतील तर तेवढीच रक्कम सरकारही त्यांच्या नावे जमा करणार. या पद्धतीने वयाच्या ६० व्या वर्षी शेतकऱ्याला ३००० पर्यंत पेंशन मिळणार. किसान पेंशन योजनेवर १० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.