बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजना 30 मार्च रोजी 90 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली. या योजनेला आणखी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही माहिती एका सरकारी प्रकाशनातून प्राप्त झाली आहे.हि योजना कोरोना रूग्णांशी थेट संपर्क साधून आणि त्यांची काळजी घेणार्या सामुदायिक आरोग्य कर्मचार्यांसह आरोग्य सुविधा देणाऱ्या सर्वांसाठी ही योजना आणली गेली. अशा लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजना कोरोना विषाणूशी लढणार्या आरोग्य कर्मचाऱ्यासांठी ३० मार्च रोजी ९० दिवसांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली. ही योजना आता पुढील 90 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.आरोग्य सेवा देणार्या लोकांना या योजनेतून 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेत वयाची कोणतीही मर्यादा नाही. तसेच या योजनेत वैयक्तिकरित्या नावनोंदणी करण्याची गरज नाही. या योजनेच्या प्रीमियमची संपूर्ण रक्कम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वहन केली आहे. या पॉलिसीअंतर्गत मिळणारा लाभ / हक्क इतर कोणत्याही पॉलिसीअंतर्गत मिळालेल्या रकमेव्यतिरिक्त असेल.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने न्यू इंडिया अॅश्युरन्स (एनआयए) कंपनी लिमिटेडबरोबर सहकार्याने या योजनेसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे विमा रक्कम उपलब्ध करुन दिली आहे.