मुंबई ः बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. दरम्यान आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेतील. राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.
तसेच शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक आहे, त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणीसोडून बाकी इतर विषय नाहीत, राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या विषयावर बोलत आहेत, त्यामुळे सरकार भूमिका घेत नाहीत, असे कसे म्हणता येईल, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये राजीनामा दिलेले संजय राठोड हे पहिले मंत्री आहेत. आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी यासाठी हा राजीनामा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.