नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नव्या दशकातील पहिल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करणार आहेत. विरोधी पक्षांबरोबर झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांनी पर्यायाचा विचार करावा असे सांगितले होते. तसेच केंद्रीय कृषि मंत्री शेतकर्यांच्या एका कॉलच्या अंतरावर असल्याचेही सांगितले होते. त्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर सर्वांनी स्वागत केले होते.
त्याचबरोबर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. त्यामुळे आजच्या ‘मन की बात’ मधून पंतप्रधान या दोन्ही विषयांवर काय मत व्यक्त करणार याविषयी उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ७३ व्या भागात देशाला संबोधित करणार आहेत.