बहुजननामा ऑनलाइन टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पोलिस कर्मचार्यांची स्तुती केली. त्यामुळे दिल्ली पोलिस कर्मचार्यांचे मनोबल वाढले आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणातील व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट एकमेकांना पाठवायला सुरवात केली होती. बर्याच पोलिसांनी भाषणाचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवला होता.
रामलीला मैदानावर पंतप्रधान म्हणाले की, पोलिस कोणतीच जात किंवा धर्म पाहत नाहीत. याची पर्वा न करता नेहमीच उभे असतात. दिल्लीत एका इमारतीला आग लागली होती त्या परिस्थितीत पोलिसांनी कोणाचाही धर्म विचारला नाही. धर्म न विचारता आगीच्या वेळी इमारतीत प्रवेश केला आणि लोकांचे प्राण वाचवले. ड्युटीवर असताना पोलिसांवर हल्ला होतो.
माजी सहाय्यक पोलीस आयुक्त काय म्हणाले ?
नुकतेच दिल्लीचे सहाय्यक पोलीस आयुक्त वेदभूषण निवृत्त झाले बेदभूषण म्हणतात, पंतप्रधानांच्या भाषणाने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा संचारेल आणि त्यांचे मनोबल वाढेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पोलिसांना असे वाटते की सरकार आता त्यांच्या पाठीशी उभे आहे. दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी अनिल मित्तल यांना असा विश्वास आहे की यामुळे पोलिसांमध्ये उर्जा निर्माण होईल. पंतप्रधानांनी पोलिसांचा सन्मान करण्याची भाषा बोलली आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. लोकांनीही कायद्याचे पालन केले पाहिजे.
Visit : bahujannama.com