नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकराने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने याविरोधात पूर्ण ताकद लावली आहे. परंतु पाकला प्रत्येक पावलावर अपयश मिळत आहे. शेवटी पाकने अशी घोषणा केली होती की, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तो जगात भारताच्या विरोधात विरोध प्रदर्शन करेल. परंतु त्याला तिथेही निराशाच हाती आली.
चीनवरून परत आल्यानंतर पाकस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले होते की, पाकिस्तान जगभरात काश्मीरचा मुद्दा घेऊन भारतीय दूतवासासमोर विरोध प्रदर्शन करेल. यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसहित अनेक देशात प्रदर्शन केलं. या प्रदर्शनचा पाकिस्तानातील मोर्चा खुद्द विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी सांभाळत होते. पाकिस्तानचा हेतू जगाचे लक्ष या प्रदर्शनाकडे आकर्षित करण्याचा होता. यात पाक पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.
काही देशातील प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तर तेथील स्थानिक पोलिसांनी अटकही केली आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटेन आणि इटलीसहित अनेक देशातील स्थित पाकिस्तानी नागरिकांनी प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी विरोध करत ब्लॅक डेदेखील साजरा केला. परंतु त्यांच्यावर जगभरातून सोशल मीडियावर टीका करण्यात आली.
खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारत विरोधचा मोर्चा सांभाळत होते. परंतु चीनव्यतीरिक्त जगभरात कोणत्याही देशाने त्यांना साथ दिली नाही. त्यांना ट्विटरवर विनवण्या कराव्या लागल्या. अखेर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना हे मान्य करावं लागलं की, एकही देश त्यांना साथ देत नाही.