बहुजननामा ऑनलाईन – गौरव दहिया यांच्यावर दिल्लीच्या एका महिलेने दुसरे लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप केले आहे. गुजरात सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून दहिया हे काम पाहतात. या आरोपाखाली सरकारने दहिया यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. हे सर्व प्रकरण दिल्ली पोलिसांच्या अधिकारात येत असल्याचे दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्याच्या पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप न करू देण्याची मागणी केली आहे.
दहिया यांच्या विरुद्ध दिल्लीच्या या महिलेने दुसरे लग्न केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. चौकशी समितीसमोर आयएएस अधिकारी दोनवेळा सामोरे गेले आहेत. यावेळी त्यांनी हा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. चौकशी समितीची स्थापना गेल्याच महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मुख्य सचिव सुनैना तोमर यांच्या अध्यक्षतेखाली केली होती.
दहिया यांच्यावर या महिलेने असाही आरोप केला आहे की या महिलेसोबत दहिया यांनी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. दहिया यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे चौकशी दरम्यान आढळून आले होते. या महिलेने दिलेले पुरावेही खरे असल्याचे आढळले आहेत. मात्र दहिया यांनी सांगितले कि, या महिलेने त्यांना हनीट्रॅप केले आहे. या महिलेला पोलिसांनी दोन वेळा जबानी नोंदवण्यासाठी बोलावले होते. यावेळी महिला नेहमी उपस्थित होती मात्र दहिया हे एकदाही गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.