बहुजननामा ऑनलाइन – भारताच्या अंतर्गत मुद्यांमध्ये लक्ष घालणार नाही तर ,ते पाकिस्तान कसले ? पाकिस्तान चे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी जम्मू- काश्मीर च्या ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाला विरोध करत , भारताला पुलवामा सारख्या घटनांना सामोरे जावे लागेल ,अशी पोकळ धमकी दिली आहे . संसदेच्या संयुक्त सत्रात त्यांनी भारत विरुद्ध विष ओकले आहे. तसेच या मुद्द्याला आपण संयुक्त राष्ट्रात घेऊन जाऊ. भाजपच्या नक्षलवादी विचारसरणीमुळे तेथील अल्पसंख्यांकांना कशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची वाच्यता आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायात करू असेही त्यांनी म्हंटले आहे.
इम्रान खान ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जम्मू-काश्मीरमधील अडचणींसाठी दोषी ठरविले आहे. तसेच इतर अनेक परिस्थितींमध्ये भारताच्या सर्व नागरिकांना समान अधिकार दिले जात नाही. इम्रान खान ने मोहम्मद अली जिन्ना यांचा उल्लेख करत म्हंटले कि, “कायदे आजम, ने सांगितल्या प्रमाणे अविभाजित भारतात , बहुसंख्य हिंदू मुस्लिमांना गुलाम बनवणार आहे”. भारताने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध प्रत्येक विकल्पावर आम्ही काम करणार आहोत, असे पाकिस्तान चे म्हणणे आहे.
भारताचा हा निर्णय कायद्या विरोधी आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. संयुक्त राष्ट्राने आणि अमेरिकेने जम्मू -काश्मीर च्या ३७० कलमाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान आणि भारताला शांतता राखण्यास सांगितले आहे. तसेच नियंत्रण रेषेवरदेखील शांतता राखण्याची मागणी केली आहे.