बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानच्या एका संसदीय समितीला सांगितलं गेलं आहे कि, भारताने पाकिस्तानसोबत असा कोणताच करार केलेला नाही कि पाकिस्तान भारताला कमी किमतीवर मिठाची निर्यात करेल.
‘द नेशन’ च्या रिपोर्ट नुसार सिनेटच्या पेट्रोलियमच्या स्थायी समितीला सोमवारी ही माहिती देण्यात आली. पाकिस्तान खनिज विकास विभाग (पीएमडीसी) चे महानिदेशक यांनी या समितीला सांगितलं कि, सोशल मीडियावर भारताच्या मीठ निर्यातीबाबत ज्या सूचना दिल्या जात आहेत. त्या चुकीच्या आहेत.
त्यांनी सांगितलं कि असा कोणताच करार झाला नाही. जो पाकिस्तानला कमी किमतीवर मीठ विकण्यासाठी अनिवार्य आहे. तसेच त्यांनी समितीला सांगितलं आहे. कि हे खरं आहे कि पाकिस्तानकडे आपल्या मिठाचा असा कोणताच ब्रँड नाही आणि भारताने तर याबाबत आपल्या ब्रॅंडिंगला खूप चांगलं बनवलं आहे. व ते हे पाकिस्तानी मीठ ते अंतरराष्ट्रीय बाजारात चांगल्या किमतीने विकत आहेत.
पीएमडीसीच्या महानिदेशकने समितीला सांगितलं आहे कि पुलवामा हमल्यानंतर पाकिस्तानी मिठाच्या किमतीवर २०० टक्यांनी वाढ केली आहे. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर मिठाची आयत करतो. त्यातच लाहोरी सेंधव मिठाची भारत अधिक मागणी करतो. अशीही माहिती देण्यात आली आहे.