बहुजननामा ऑनलाइन टीम – पाकिस्तान (Pakistan) ने आता जगात भारतीय उपखंडातील इतिहासाशी संबंधित खोटी माहिती पसरवण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी व्हिएतनाम (Vietnam) मधील पाकिस्तानचे राजदूत कमर अब्बास खोखर (Qamar Abbas Khokhar) यांनी दावा केला आहे की तक्षशिला विद्यापीठ (Takshshila University) भारतात नसून ‘प्राचीन पाकिस्तान’चा भाग आहे. खोखर यांनी ट्विटरवर दावा केला की, तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानात होते आणि चाणक्य व पाणिनी (Chanakya and Panini) सारखे विद्वानही पाकिस्तानचे पुत्र आहेत. मात्र, खोखर यांचा हा दावा ट्विटर वापरकर्त्यांनी फेटाळून लावला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
https://twitter.com/mqakhokhar/status/1338131075822878721?ref_src=twsrc%5Etfw
खोखर यांनी तक्षशिला विद्यापीठाचे एक कथित छायाचित्र ट्वीट करून म्हटले आहे की, ‘तक्षशिला विद्यापीठाचे हे एक हवाई चित्र आहे जे पुन्हा तयार करण्यात आले आहे. हे विद्यापीठ 2700 वर्षांपूर्वी प्राचीन पाकिस्तानमधील इस्लामाबादजवळ होते. या विद्यापीठात जगातील 16 देशांतील विद्यार्थी 64 वेगवेगळ्या विषयांत उच्च शिक्षण घेत असत, ज्यांना पाणिनी सारखे विद्वान शिकवत होते.
https://twitter.com/mqakhokhar/status/1338195112023638016?ref_src=twsrc%5Etfw
मात्र, खोखर यांच्या या दाव्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी असा प्रश्न केला की 14-15 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तान अस्तित्वात नव्हताच तर त्याच्या इतिहासाचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक म्हणाले की चाणक्य हे भारतीय उपखंडातील राजा चंद्रगुप्त मौर्याचे मंत्री होते आणि त्यांच्या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (पटना) होती. हे क्षेत्र भारतातील बिहार राज्यातील आहे.
खोखर यांनी ट्रोल होऊनही आणखी एक ट्विट केले आणि म्हटले की जगातील पहिले भाषातज्ज्ञ पाणिनी आणि जगप्रसिद्ध राजकीय तत्ववेत्ता चाणक्य हे दोघेही प्राचीन पाकिस्तानचे पुत्र होते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान बऱ्याच काळापासून आपल्या शालेय पुस्तकांमध्ये असा खोटा इतिहास शिकवित आहे. भारतीय इतिहासाला या पुस्तकांमध्ये हिंदूंचा इतिहास म्हणून शिकविले जाते. विद्यार्थ्यांना सांगितले जाते की हिंदू-मुस्लिमांच्या मूलभूत श्रद्धेला मोठा विरोध आहे, ज्यामुळे भारत-पाकची फाळणी झाली. शासक वर्गाला खूश करण्यासाठी पाकिस्तानमध्ये शालेय पुस्तके सातत्याने लिहिली जात आहेत. पुस्तकांमधील अस्सल तथ्यांकडे दुर्लक्ष करून गोष्टींच्या आधारे शिक्षण दिले जात आहे.