नवी दिल्ली वृत्तसंस्था : यंदा झालेल्या जोरदार पावसाने देशाला चांगलेच झोडपून टाकले आहे, देशात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सोबतच इतर चार राज्यांनादेखील या महापुराचा फटका बसला आहे , देशात आतपर्यंत १९० जणांचे बळी गेले आहेत. या पुरामुळे महाराष्ट्रातील ४० , कर्नाटकात ६० , गुजरातमध्ये २२ तर केरळ मध्ये ६८ जणांचा जणांचा आपला प्राण गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लाखो लोकांना आपले घरदार सोडून मागे स्थलांतर करावे लागले आहे. महाराष्ट्रात सुमारे सात लाख तर केरळ मध्ये दोन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सांगली जिल्यात १९ , कोल्हापुरात ६, साताऱ्यात ७ तर पुण्यातदेखील ७ आणि सोलापूर मध्ये एकाचा या महापुरामुळे मुत्यू झाला आहे. तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत . त्यात ब्रम्हणाळ मध्ये आज ५ जणांचा मृत्यू झाला.
स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे, कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ तर सांगली मध्ये ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाटक मध्ये ६० लोकांना या पुराच्या तांडवामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. तुंगभद्रा नदीला आलेल्या पुरामुळे दावणगिरी जिल्याचे अनेक गावांना पाण्याचा फटका बसला आहे, अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. राज्यातील लोकांनी काळजी करू नये, सरकार मदतीसाठी प्राधान्य देत आहे. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे. कर्नाटकात अजूनही १४ जणांचा शोध लागलेला नाही, तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
केरळ मध्ये असेच गंभीर चित्र पाहण्यास मिळत आहे. आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला असून , जवळपास ७० हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. केरळ मध्ये दीड हजारांपेक्षा जास्त मदत छावण्या कार्यरत आहेत. काही जिल्यांत रेड अलर्ट देखील घोषित केला आहे. पुथमला येथे दरड कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी पुरस्थितीची हवाई पाहणी करत , मदतीसाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले.
घराघरात पाणी घुसल्याने पिरिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यातच लष्कर देवदूताप्रमाणे सर्वतोपरी मदत करत आहे. वायनाडमध्ये पुरात अडकलेल्या एक नवजात बालकाला सुखरूपपणे वाचवण्यात लष्कराला यश मिळाले आहे. गुजरातमध्ये मध्ये देखील घराघरात पाण्याचे वास्तव्य आहे. अशातच पोलीस आणि एनडीआरएफ यांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. सध्या एका पोलीस कॉन्स्टेबल चा विडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे. कंबराईच्या पाण्यातून पृथ्वीराज जडेजा हा कॉन्स्टेबल कशीतरी वाट काढत दोन लहान मुलींना खांद्यावर घेत चालला आहे. हि घटना कल्याणपूर गावातील आहे . आपल्या ह्या कार्यामुळे पृथ्वीराज जडेजा यांचे कौतुक होत आहे.