बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद(Osmanabad) यांचा महाराष्ट्रातील बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द केला आहे. ११ जानेवारी रोजी हा आदेश आरबीआयने काढला आहे.
सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंध यांना बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली आहे.
सध्याची बँकेची आर्थिक स्थिती पहाता ठेवीदारांना त्यांची देय रक्कम देण्यास बँक असमर्थ आहे. जनतेच्या हितासाठी आणि बँकेच्या व्यवहाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्या ठेवीदारांच्या हितासाठी बँकेचे कामकाज रोखणे(Osmanabad) आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने परवाना रद्द केल्याने आता सहकार विभागाला बँकेवर लिव्हिडेटर नेमून कर्जाची वसुली करुन तसेच बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे.
वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील ९९ टक्क्याहून अधिक खातेदारांना त्यांची जमा रक्कम परत देण्यात येणार आहे. डीआयसीजीसीकडून ही रक्कम दिली जाणार आहे. खातेदारांना त्यांची जमा रक्कम देण्याची वसंतदादा नागरी सहकारी बँकेची वित्तीय स्थिती नाही. त्यामुळे डीआयसीजीसीकडून ही रक्कम दिली जाणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.