नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना फाशी देण्याची तयारी सुरु असताना तिहार कारागृह प्रशासनाने दोषींना नोटीस बजावून त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल त्यांना विचारण्यात आले आहे. तसेच जेल प्रशासनानेही दोषींना अनेक प्रश्न विचारले आहेत. तुरुंगातील नियमावलीनुसार फाशीची शिक्षा सुनावल्या कैद्यांना फाशी देण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल विचारले जाते आणि त्यांची इच्छा पूर्ण होते.
तुरुंग प्रशासनाने निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यापूर्वी त्यांना शेवटच्या बैठकीत कोणाला भेटायचे असल्याचे विचारले. त्यांच्या नावावर मालमत्ता किंवा बँक खात्यात काही रक्कम जमा झाली असेल तर ते ती कोणाकडे हस्तांतरित करायची असल्याचे विचारण्यात आले. तसेच ते कोणाला नॉमिनी बनवू इच्छित आहेत का किंवा काही धार्मिक किंवा आवडते पुस्तक वाचायचे आहे का, असेही विचारण्यात आले.
यादरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करताना फाशीची शिक्षा प्रकरणात दोषीला शिक्षा झालेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक सूचना केवळ गुन्हेगाराच्या हितसंबंधाबाबत बोलले. प्रत्येक वेळेस निर्भयाचे दोषी कोर्टात पोहोचल्यावर फाशीची तारीख बदलण्यासाठी चर्चा सुरू झाली. तसेच जर एखाद्या दोषीची दयायाचिका राष्ट्रपतींनी फेटाळली तर त्याला सात दिवसांच्या आत फाशी देण्यात यावी. तिचा पुनर्विचार याचिकेला किंवा गुणात्मक याचिकेला महत्व दिले जाऊ नये.