पटना : वृत्तसंस्था – वनविभागाने जवळपास 300 नीलगायींना जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार बिहार राज्यातून समोर आला आहे. जमिनीत पुरत 300 नीलगायींना वनविभागाने ठार केले आहे. गाईला जिवंत पुरतानाचा या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर आगीसारखा पसरत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
निलगायी शेतात शिरून शेताचं नुकसान करतात अशी तक्रार बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वन विभागाने केली. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विन विभागाने नीलगायींना मारण्यासाठी शिकाऱ्यांची मदत घेतली. विन विभागाने तब्बल 300 नीलगायींना ठार केले. यातील एका गाईला तर जेसीबीच्या मदतीने जिवंत पुरण्यात आले. विन विभागाच्या या धक्कादायक कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्याने पसरत आहे.
https://twitter.com/
एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, “बिहारमधील नितीश कुमार यांच्या सत्ताधारी जेडीयू पक्षाचे आमदार राज किशोर सिंग यांच्याकडे स्थानिकांनी तक्रार केली की, नीलगायी शेतीचं नुकसान करत आहेत. यानंतर सिंग यांनी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला हाताशी धरत शिकाऱ्यांची मदत घेतली. सध्या वन विभागाच्या कारवाईचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मात्र सिंग यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओत किती सत्यता आहे असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.
नीलगायीला जिवंत पुरल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्राणीप्रेमी आणि नेटकऱ्यांकडून वन विभागावर टीका होताना दिसत आहे. नेटकऱ्यांना हा प्रकार अमानुष असल्याचं म्हटलं आहे. यानंतर वैशालीचे पोलीस अधिक्षक मनवीत सिंग ढिल्लन यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची सत्यता तपासून या घटनेसंदर्भात वन खात्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर दोषींवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी