वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपच्या (Nilesh Rane’s)फैरी सुरु आहेत. त्यातच आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश(Nilesh Rane’s) यांनी एक जुनी घटना आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या जुन्या बातम्यांचे स्क्रिनशॉट निलेश राणे यांनी ट्विटरवर टाकून म्हटलं की, “कराल काय स्वतःला अटक ?? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो. pic.twitter.com/yYv3NLptNq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
काय आहे प्रकरण !
उस्मानाबादमधील तडवळे गावातील दिलीप ढवळे (५९) या शेतकऱ्याने २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी एक सुसाईड नोट लिहली होती. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. या दोघांनी केलेल्या फसवणुकीमुळेच आपल्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले होते. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पडले.
आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरली गेली. हमी देवूनही परतफेड न केल्याने जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारण्यात आला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहले होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव होते.
दिलीप ढवळे कुटूंबीयांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
दरम्यान, गुरुवारी ढवळे कुटूंबीयांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेत तपासावर नाराजी व्यक्त केली. “अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत कायदेशीर कारवाई केली गेली. तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अन्य आरोपींवर तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले काय, असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.