मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील पूरस्थिती पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व खासदार आणि आमदार आपला एक महिन्याचा पगार राज्यातील पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यात सध्या पूराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्हे, कोकण, ग़डचिरोली या भागात पावसाने आणि महापूराने हाहाकार माजला आहे. त्यामुळे अशा स्थितीत राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि खासदार यांनी पूरग्रस्तांना आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये पाहणी केली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यात पूरस्थिती असताना महाजनादेश यात्रा काढली असून ते आता राज्यात महाजनादेश यात्रेत फिरत आहेत. अशी टीका राष्ट्रवादीने केली.
सांगलीच्या ब्रम्हनाळमध्ये ३० जणांनी भरलेली बोट उलटली. त्यात १६ जणांचा दूर्दैवी मृत्यू झाला. बोटीची क्षमता कीती, किती व्यक्ती सामावू शकतात याचा विचार या बेअक्कल सरकारला करायला नको? ४ दिवस पाऊस पडतोय यांना आता बचावकार्य सुचलं. या घटना शरमेनं मान खाली घालवणाऱ्या आहेत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व खासदार-आमदार आपला एक महिन्याचा पगार राज्यातील पूरग्रस्तांना देणार..
मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp यांची घोषणा..
— NCP (@NCPspeaks) August 8, 2019