नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या नव्या केस दरदिवशी वाढत आहेत. मागील 24 तासात कोरोनाची 86 हजार 432 नवी प्रकरणे समोर आली, तर 1089 लोकांना आपला जीव गमवावा लागला. नव्या केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमितांची एकुण संख्या 40, 23,179 झाली आहे. शुक्रवारी देशात 83,341 नवे रूग्ण सापडले होते, तर 1,096 लोकांचा मृत्यू झाला होता.
India's #COVID19 tally crosses 40 lakh with single-day spike of 86,432 new cases & 1,089 deaths reported in the last 24 hours.
The total case tally stands at 40,23,179 including 8,46,395 active cases, 31,07,223 cured/discharged/migrated & 69,561 deaths: Ministry of Health pic.twitter.com/IkmNVuhaRm
— ANI (@ANI) September 5, 2020
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आता कोरोनाच्या 8 लाख 46 हजार 395 अॅक्टिव्ह केस आहेत, तर कोरोना संसर्गामुळे 69 हजार 561 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 31 लाख 7 हजार 223 लोक रिकव्हर झाले आहेत.
महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात कोविड-19 ची सर्वाधिक 19,218 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 8,63,062 झाली आहे. आरोग्य विभागानुसार आणखी 378 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकुण संख्या वाढून 25,964 झाली आहे. सध्या राज्यात 2,10,978 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणखी 13,289 रूग्णांना हास्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर आतापर्यंत राज्यात 6,25,773 रूग्ण बरे झाले आहेत.
शुक्रवारी गुजरातमध्ये कोरोना व्हायरसची दिवसभरात सर्वात जास्त 1320 नवी प्रकरणे आली. तर 24 तासात 14 रूग्णांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये शुक्रवारी 1,498 नवी प्रकरणे आली, तर 49 रूग्णांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 1570 नवी प्रकरणे समोर आली.