मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता संघर्ष आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात फडणवीसांच्या शपथविधीसंदर्भात सुनावणी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४८ तासांनी अचानक मंत्रालयात दाखल होऊन मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांत जोरदार हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांनी एकत्रपणे राजभवनात राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सर्व राजकीय पक्ष इतके सक्रीय का झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होण्याआधीच प्रत्येक पक्ष आपली बाजू सक्षम करण्याच्या तयारीत आहे. फडणवीस यांना मी मुख्यमंत्रीची जबाबदारी स्वीकारली आहे, असे न्यायालयाला दाखवून द्यायचे आहे. यात दुसरीकडे महाविकासआघाडीने न्यायालयाच्या निर्णयाआधीच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
दरम्यान, कोर्टाने सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत २४ तासांसाठी त्यांचा निर्णय राखून ठेवला. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. न्यायालय विधानसभेचे अधिवेशन कधी बोलवाचे यासंदर्भात निर्णय देऊ शकतो. अन्यथा गुरुवारी किंवा शुक्रवारी रोजी विधानसभेचे सत्र बोलवावे लागू शकते. विधानसभेचे एक सत्र नव्या सदस्यांना शपथ देण्यासाठी आणि अध्यक्षांच्या निवडीसाठी जाईल. त्यानंतर सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागेल.
Visit : bahujannama.com