मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – महाशिवआघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विनायक राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. 162 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र महाविकासआघाडीने राज्यपालांसह विधानसभा सचिवांना दिले आहे. मात्र, यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्राबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलेले पत्र म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा नसून हे दिशाभूल करणारे पत्र आहे. या पत्रावर गटनेत्याची स्वाक्षरी नाही त्यामुळे आम्ही ते गांभीर्याने घेणार नाही, असे आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
आशीष शेलार म्हणाले की, कोणत्या राजकीय पक्षाला, आघाडीला सत्ता स्थापनेचा दावा करतना गटनेता कोण ? सरकार कोणाच्या नेतृत्वात सरकार बनेल ? प्रस्तावित मुख्यमंत्री कोण ? हे राज्यपालांना दिल्या जाणाऱ्या पत्रात स्पष्ट करावे लागते. मात्र, महाविकासआघाडीने दिलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले नाही. महाशिवआघाडी राज्यपालांसह राज्याचीच जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे या पत्राला आम्ही गांभीर्याने घेणार नाही. त्यामुळे सत्तानाट्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आहेत, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे विद्यामान सरकारला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. मात्र, आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण शिवसेनेच्या ५६, राष्ट्रवादीच्या ५० कॉंग्रेसच्या ४४ आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सद्या घेण्यात आल्या आहेत.तीन पक्षांच्या आमदारांचं सह्या असणारं प्रतिज्ञापत्र आज सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
Visit : bahujannama.com