बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिक्षणाने उंच शिखर गाठता येते, असे म्हटले जाते. पण हेच शिक्षण घेताना जर दुर्लक्ष केले, टाळाटाळ केली तर अनेकांकडून ऐकावेही लागते. मात्र, व्यंकटेश अय्यर यांनी शिक्षण जरी जास्त नसले तरीही एक मोठे उदाहरण दिले आहे.
गोली वडापावचे संस्थापक व्यंकटेश अय्यर यांचा थक्क करणारा प्रवास. वडापाव विकून व्यवसायात त्यांनी त्याच व्यवसायात स्वत:चे नाव उंच केले. व्यंकटेश अय्यर यांनी स्वत:च्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर देशभरात तब्बल 350 आउटलेट्स उघडले आणि त्याचं नाव ठेवलं गोली वडापाव. त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून, हावर्ड बिजनेस स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबाद यांसारख्या संस्थांकडून केस स्टडीही केला जात आहे. गोली वडापाव तुमच्या शहरात याचे अनेक आऊटलेट्स असतील. या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर 50 कोटी रुपये आहे.
कंपनीचे संस्थापक व्यंकटेश अय्यर यांनी 2004 मध्ये ‘बॉम्बे बर्गर’ म्हणून वडापाव कंपनीची स्थापना केली. पण आता हा वडापाव ‘गोली वडापाव’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आज याच कंपनीचे देशभरात 350 आऊटलेट्स आहेत. ‘द बेटर इंडिया’ला मुलाखत देताना व्यंकटेश यांनी सांगितले, की जर तुम्ही चांगले शिक्षण घेतले नाही तर तुम्हाला वडापावच विकावा लागेल.
इतरांना रोजगार देण्याचा हेतू
व्यंकटेश अय्यर यांनी स्वत: व्यवसाय सुरु करण्यापूर्वी 15 वर्षे फायनान्स सेक्टरमध्ये काम केले. रिटेल सेक्टर मजबूत करणे असा उद्देश गेल्या अनेक वर्षांपासून होता. याशिवाय अनेक गरजू लोकांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, असाही त्यांचा यामागचा हेतू होता.