नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिल्यांदाच भारतीय सैन्यात जवान पदांसाठी महिलांची भरती होत आहे. बेळगावात महिला सैन्य भरतीचे आयोजन केले जाणार आहे. १ ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. १०० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. याआधी सैन्य दलात महिलांची केवळ अधिकारी पदासाठीच भरती होत असे. परंतु आता मात्र पोलीस म्हणून महिलांना संधी मिळणार आहे. मराठा लाईफ इंफ्रंटीमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
काय आहे पात्रता ?
ज्या मुलींना दहावीत ८६ टक्क्यांहून अधिक गुण आहेत आणि त्यांचे वय सोडे सतरा ते २१ वयोगटादरम्यान आहेत. अशा मुली या भरतीसाठी पात्र आहेत. १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भरतीमध्ये 1 ते 5 ऑगस्टदरम्यान महिलांची शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. या दोन्हीही चाचण्यात ज्या महिला यशस्वी होतील त्यांनाच परीक्षा देता येणार आहे. 1 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत ही भरती सुरु राहणार आहे.
महिलांचे सैनिक म्हणून मिलिट्री पोलीस कोरमध्ये भरती होणे हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. आतापर्यंत सशस्त्र दलात महिलांची केवळ अधिकारी पदासाठीच भरती केली जात होती. यानंतर आता सैन्य दलाने पहिल्यांदाच महिला प्रोवोस्ट युनिट बनवण्याचा विचार सुरु केला आहे.