मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नसून आजही गेल्या 24 तास राज्यात 16 हजार 620 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ही संख्या कालच्या तुलनेत 1018 ने अधीक आहे. काल ही संख्या 15 हजार 602 इतकी होती. तर गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 861 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचबरोबर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजार 231 वर जाऊन पोहचली आहे.
आज राज्यात एकूण 50 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 52 हजार 861 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.28 टक्के इतका आहे. तर आजपर्य़ंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 92.21 टक्के इतका आहे.
Maharashtra reports 16,620 new COVID-19 cases, 8,861 discharges, and 50 deaths in the last 24 hours
Total cases: 23,14,413
Total discharges: 21,34,072
Death toll: 52,861
Active cases: 1,26,231 pic.twitter.com/7gie7hPvFI— ANI (@ANI) March 14, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 75 लाख 16 हजार 885 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 23 लाख 14 हजार 413 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.21 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 83 हजार 713 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5 हजार 493 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्याचा ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढला
राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाक 26 हजार 231 इतकी आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 25 हजार 673 इतके रुग्ण आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढला असून 16 हजार 964 इतका झाला आहे. मुंबईमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 हजार 535 तर ठाण्यात 12 हजार 332 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये देखील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. नाशिकमध्ये सध्या 7 हजार 688 ॲक्टिव्ह रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत.