बहुजननामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विरोधात बीएमसीच्या कारवाईमुळे मुंबईत राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. तीन नेत्यांची ही बैठक मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. ही बैठक एका तासापेक्षा जास्त काळ चालली. तत्पूर्वी बीएमसीचे आयुक्त सीएम उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. यासह बैठकीत कंगनाच्या कार्यालयात झालेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासनाने ही कारवाई केली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यामध्ये राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही आणि हे राज्याचे प्रकरण देखील नाही. अशात या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये.
विशेष म्हणजे कंगना रणौतला निशाण्यावर घेतल्याने शिवसेना चहूबाजूंनी वेढलेल्या अवस्थेत आहे. त्यांना मित्रपक्षांकडूनही पाठिंबा मिळत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीएमसीची कारवाई अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, बीएमसीच्या या कारवाईमुळे कंगनाला अनावश्यकपणे बोलण्याची संधी मिळाली आहे. मुंबईत इतरही अनेक बेकायदा बांधकामे आहेत. अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पाहण्याची गरज आहे.
कॉंग्रेसनेही हात झटकले
या विषयावर शिवसेनेला कॉंग्रेसचे देखील सहकार्य मिळत नाही. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्वीट केले की कंगनाचे कार्यालय बेकायदेशीर होते की कंगनाला डिमॉलिश करण्याची पद्धत? कारण हायकोर्टाने ही कारवाई चुकीची मानली आहे आणि त्यास त्वरित थांबविले आहे. संपूर्ण कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली. पण सूड घेण्याच्या राजकारणाचे वय खूपच लहान असते. कदाचित एका कार्यालयाच्या भानगडीत शिवसेनेचे डिमॉलिशन सुरू होऊ नये म्हणजे झालं.
संजय राऊतांनी दिली ही प्रतिक्रिया
त्याचवेळी, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना रणौत यांच्याशी सुरू असलेल्या वादादरम्यान विधान केले आहे. बीएमसीने केलेल्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले की ही सरकारची कारवाई आहे, मला यात काही देणेघेणे नाही. जेव्हा कंगनाने शिवसेनेला बाबरची सेना म्हणून संबोधले तेव्हा संजय राऊत म्हणाले की बाबरी पाडणारे आम्हीच, आम्हाला काय सांगता.