मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्याबाबतचे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवार) जनतेशी संवाद साधताना दिले. त्यानंतर आता राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाविषयक विविध बाबींवर भाष्य केले. तसेच त्यांनी राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिला. कोरोनाला रोखायचे कसे तज्ज्ञांशी बोलून लवकरच निर्णय घेणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुरे पडतील इतक्या संख्येने डॉक्टर्स आणि नर्सेस आणायच्या कुठून असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नातून त्यांनी आता लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे संकेत दिले होते. तसेच राज्याला सध्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारचे मत आहे. त्यानंतर आता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कोणत्याही लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये, अशी मागणी केली जात आहे. तसेच विरोधीपक्षांसह अनेक घटक राज्यात लॉकडाऊन नको, असे म्हणत आहेत. पण आता लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.