बहुजननामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सत्तास्थापने संदर्भात केलेल्या विधानामुळे राजकारणात नवीन चर्चेला उधाण आलं आहे. ‘ महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच शिवसेनेसोबतही कुठलाच मसुदा तयार झालेला नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी यावेळी म्हंटल.
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या जाळ्यात अडकू नये. राज्यातील जनतेला ते कधीच मान्य होणार नाही,’ असं ट्वीट राजू शेट्टी यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजू शेट्टींना राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये. सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही.@thodkyaat @MySarkarnama @abpmajhatv @zee24taasnews @TV9Bharatvarsh @bbcnewsmarathi @ibnlokmattv1 @samtv
— Raju Shetti (@rajushetti) November 18, 2019
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची काळ दिल्लीत भेट झाली. राज्यात सरकार स्थापन कधी होणार, शिवसेनेला पाठिंबा द्यायला कि नाही, काँग्रेस – राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण भेटीनंतर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ता सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली आहे.कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्यक आल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील हे मोठे मुद्दे :
– सध्या फक्त राष्ट्रवादीबद्दल बोलणार. शिवसेनेविषयी नाही.
– सोनिया गांधी यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा, शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधी चर्चा नाही.
-राज्यातल्या विधीमंडळातल्या नेत्यांसोबत झालेली चर्चा किमान समान कार्यक्रमाविषयी नाही.
– तसेच राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाची चर्चा नाही.
– संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच विचारा ते मी कसं सांगणार,
– कोणाबरोबर जायचं, हे अजून निश्चित नाही. आमच्याकडे अजून ६ महिन्यांचा वेळ आहे.
– आमचा फक्त ५४ आमदारांचा पक्ष आहे, आम्ही कशी सत्ता स्थापन करणार ?
-भाजपबरोबर जाणार नाही हे निश्चित का, यावर पवार म्हणाले आम्ही निवडणूक त्यांच्याविरोधात लढलो.
Visit : bahujannama.com