मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक घेण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २८८ जागांसाठी मतदान घेण्यात आलं. त्यानंतर विविध वृत्तसंस्थांनी आपले एक्झिस्ट पोल दिल्यानंतर सर्वत्र निकालासंदर्भात चर्चा रंगली आहे. सर्वच वाहिन्यांच्या एक्झिस्ट पोलचा आढावा घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याचे आकडे समोर आले असून विरोधी आघाडी सरकारला ५०- ६० जागा मिळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या एक्झिस्ट पोलचा विरोध करत ओपिनियन पोल असो वा एक्झिस्ट पोल सर्वजण एकाच पक्षाला वरचढ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, ‘आम्हाला खात्री आहे , या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल. शरद पवार तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या सभांना जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता जनतेचा कौल हा आमच्याच बाजूने असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच असे एक्झिस्ट पोल दाखवून जनतेची मने वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोबतच ‘दाल मे कुछ काला हे’ असे म्हणत जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाविषयी शंकाही व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले कि, जनतेत शंकारहित निवडणूक व्हायला हवी. मात्र हे होताना दिसत नाहीये. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक जण शंका व्यक्त करत आहे. अश्यावेळी जनतेच्या शंकाचे निरसन करणे सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगदेखील आदेशाप्रमाणे वागत आहेत. असे आरोप त्यांनी भाजप-शिवसेनेवर केले आहेत.
Visit : bahujannama.com