पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात म्हणाले एमपीएससीच प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. तर एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही. असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे मात्र सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. यावेळी त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचं सांगितलं. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्दतीने खराब करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे माध्यमाशी बोलताना म्हणाले, मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचं उत्तर देईन, मी पहिल्यांदाच सांगितलं की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवं होतं. एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे, असं त्यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाउन होणार नसल्याचं सांगितलं आहे. पुणेकर तसंच राज्यातील जनतेला करोना संकट गांभीर्याने घेण्याची विनंती केली. जास्तीत जास्त लसीकरण कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून केंद्राच्या आदेशाचं पालन करावं लागतं असं अजित पवार म्हणाले. तसेच काही बाबतीत नियमांचं पालन केलं जात नसल्याने नाईलाज म्हणून आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत असही त्यांनी म्हटलं आहे.