बहुजननामा ऑनलाईन टीम – मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात ठीक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होत आहे. अशीच स्थिती सध्या बदलापूर, वांगणी परिसरात ही मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे रेल्वेरूळ पाण्याखाली आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर आणि वांगणी स्थानकांमध्ये काळ रात्रीपासून अडकली आहे. या एक्स्प्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी तातडीने एनडीआरएफनी सुरुवात केली. बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेसमधील २००० प्रवासांना सुखरूप काढण्यात यश आले आहे. तब्बल १७ तासानंतर या प्रवाशांची सुटका झाली आहे.
– काल रात्रीपासून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान अडकली.
– २००० प्रवासी एक्सप्रेस मध्ये अडकले होते.
– १७ तासानंतर एनडीआरएफच्या पथकाने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
– सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
– प्रवाशांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली.
– बदलापूर येथून प्रवाशांना मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
– मुंबईतून ५० जणांची टीम एकूण ६ बोटीच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली होती.
– पुण्यातून ४० जणांची टीम आणि ५ बोटींसह बाच्वकार्यास सुरुवात करण्यात आली होती.