बहुजननामा ऑनलाईन – देशातील अनेक राज्ये सध्या पाण्याखाली गेली आहेत. यंदाच्या पावसाने अनेक भाग हे जलमय झाले आहे. कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात परिस्थिती सध्या गंभीर आहे. कर्नाटकातील उडुप्पी मंदिराच्या परिसरात अनेक फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. तर महाराष्ट्रातील गडचिरोली मध्ये पावसानंतर स्थिती गंभीर आहे. २०० गावांचे संपर्क तुटले असून ४०० लोकांना वाचवण्यात आले आहे. मध्यप्रदेश मधील अनेक भागांत देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. बर्याच ठिकाणी नद्यांच्या पाण्याची पातळी ही धोक्याची चिन्हे ओलांडली आहे. यामुळे हजारो एकर पिके नष्ट झाली आहेत.
Jagmohan Meena, Superintendent Of Police, Malkangiri: Villages Majhiguda & Kenduguda of Khairaput area have been cut off after a portion of a road was washed away due to incessant rain. 5 people, including 2 pregnant women & 2 children were rescued from the area. #Odisha (7.8.19) pic.twitter.com/w3NFvrJHjk
— ANI (@ANI) August 7, 2019
मध्यप्रदेश मधील २८ गावांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाळवंटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर अनेक गावांचे संपर्क तुटले आहे. केरळ आणि ओडिशा मध्ये मुसळधार पावसामुळे नद्या भरून वाहत आहेत. तर छत्तिसगढ मध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचे जिल्हा मुख्यलयातून संपर्क तुटला आहे. गोव्या मध्ये देखील पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
भुवनेश्वरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
ओरिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मालकानगिरी जिल्ह्यात देखील पूरपरिस्थिती झाल्याने नागरिकनचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील नद्या मोठ्या प्रमाणात भरून वाहत असल्याने दुसऱ्या जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
मध्य प्रदेशातील 28 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
मध्य प्रदेशमधील २८ जिल्ह्यांत सतर्कत्याचे आवाहन देण्यात आले आहे. २४ तासांसाठी या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. अनुपपूर, डिंडोरी, उमरिया, शहडोल, कटनी, अलिराजपूर, झाबुआ, बडवानी, धार, निमच, मंदसौर, राजगढ, गुना, श्योपूरकला, अशोकनगर, जबलपूर, मंडला, बालाघाट,छिंदवाडा, सिवनी, सागर, दमोह, रायसेन, विदिशा, सिहोर, होशंगाबाद, बैतुल, हरदा या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला.
मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना
मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्या आहेत. हिमाचल मध्ये कुल्लू मधील ब्यास नदीत एक कार वाहून गेली. कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते. अथक प्रयत्नाने या दोन व्यक्तींना वाचवण्यात यश आले. त्याचबरोबर मध्यप्रदेश मध्येही प्रवासानी भरलेली एक बस पाण्यात अडकली होती.
कर्नाटकमध्येही रेड अलर्ट, शाळा महाविद्यालये बंद
कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पावसामुळे पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जरी करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील पावसाचा अंदाज
उत्तर प्रदेशच्या वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.