औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – Lumpy Skin Disease Virus | देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरु लागला आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन (Livestock) विशेषत: गाई आणि काही प्रमाणात म्हशी या लम्पी रोगाला बळी पडत आहेत. देशातील 12 राज्यात जवळपास 165 जिल्ह्यातील 11.25 लाख गाई-म्हशींना या रोगाचा (Lumpy Skin Disease Virus) प्रादुर्भाव झाला आहे. तर आतापर्यंत 50 हजार जनावारांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
औरंगाबाद मध्ये 32 जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुदैवाने अद्याप एकाही जनावाराचा मृत्यू झाला नाही. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center for Animals) सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकारी (Collector) यांना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लम्पी रोगाबाबत उपाय योजनेविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, लम्पी आजारावर लस उपलब्ध (Vaccine Available) केली आहे.
लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांची जनवारे मृत्यूमुखी पडली आहेत त्यांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषाप्रमाणे मदत राज्य सरकार करेल.
तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
Web Title :- Lumpy Skin Disease Virus | cm eknath shinde has given instructions to start a quarantine center for animals due to lumpy skin disease virus
हे देखील वाचा :