मुंबई: Lok Sabha Election Results 2024 | भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा हात धरावा लागणार असल्याचे समोर येत असलेल्या निकाल आणि कलांवरून स्पष्ट झाले आहे. परंतु, युतीचे भागीदार हात झटकण्यात अजिबात उशीर करत नाहीत, हे वारे इंडिया आघाडीच्या (India Aghadi) दिशेने वाहू लागले, तर भाजपपुढे आपले युती वाचविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
भाजपच्या मोठ्या मित्रपक्षांबद्दल बोलायचे तर, त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचाही समावेश आहे, ज्यांना राज्यातील ४० पैकी १५ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजप येथे १२ जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. तर भाजपने १७ जागांवर निवडणूक लढवली असून नितीश यांच्या जेडीयूने १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
आता सर्वांच्या नजरा नितीश कुमार यांच्यावर आहेत, त्यांनी पुन्हा एकदा बाजू बदलली तर ते किंग मेकर सिद्ध होऊ शकतात. नितीश कुमार यांच्याशिवाय तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आंध्र प्रदेशातही मोठी कामगिरी केली असून पक्ष एकूण १६ जागांवर आघाडीवर आहे.
अशा स्थितीत विरोधी पक्षांनी चंद्राबाबू नायडूंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूनंतर आता विरोधकांच्या नजरा टीडीपीवरच खिळल्या आहेत. तसेच एनडीएच्या इतर पक्षांनाही फोडण्याचे प्रयत्न केले जातील. नितिशकुमार ‘किंगमेकर’ ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.