बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या कालावधीत अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांची वेतन कपात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये घरखर्च भागवणे अवघड झालं आहे. परंतु, केंद्र आणि राज्य सरकार महागाई कमी करण्याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. राज्य सरकार वीज बिलाचे दर कमी करण्यास तयार नाही. दुसरीकडे केंद्र सरकार पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे दर वाढवत आहे. त्यातच केंद्र सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारनं वीज, पेट्रोलचे दर वाढवले आणि आता एलपीजी सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले. अशा महागाईत घरखर्च कसा भागवायचा? सरकारने चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यांतून धुरामुळे पाणी येऊ नये म्हणून एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून दिले. दर वाढल्याने आम्ही पुन्हा लाकडावर स्वयंपाक करायचा का, असा प्रश्न गृहिणींनी उपस्थित केला आहे.
सिलिंडरचे दर वाढीबाबत महिलांची प्रतिक्रिया
‘माझ्या कुटुंबात पाच व्यक्ती असून एकच माणूस कमावणारा आहे. आम्ही काटकसर करून जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु सरकार जनतेला महागाईत खाईत ढकलून देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सरकारने वीज, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत.’
‘मुलगी धुण्या-भांड्याचे काम करून घर सांभाळते. महागाई वाढतच चालली आहे. या सरकारने पुन्हा लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ आणली,’