कराड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करण्यात यावी. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नाधवडे येथील ग्रंथपाल रविंद्र राजाराम कामत यांनी कराडमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात शुक्रवार दि.२२ पासून कामत यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासन फसवणूक करत असल्याचा दावा करत ग्रंथालयांचे अनुदान वाढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. असा इशारा कामत यांनी दिला आहे.
राज्यातील विविध ग्रंथालयांच्या प्रतिनिधीनी यापूर्वी शासनाला निवेदने दिले होते . तीन वर्षापूर्वी मंत्री स्तरावर याबाबत बैठक घेण्यात आली होती. मात्र त्यानंतरही राज्य शासनाने ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ केलेली नाही. हे सरकार नको तिथे पैसे खर्च करतो पण ग्रंथालयाला अनुदान देत नाही. या निषेधार्थ हे आंदोलन सुरू
करण्यात आले आहे.
यावेळी राज्यातील सर्व विविध भागातील ग्रंथपालांनी आंदोलनास हजेरी लावत कामत यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहेत. शनिवारी मुंबई-ठाणे परिसरातील ग्रंथपालांनी आंदोलनास हजेरी लावत दिवसभर धरणे आंदोलन केले.