मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यूरोपीय यूनियन (ईयू) च्या संसदेने बुधवारी ब्रेक्झिट कराराला मंजूरी दिली आहे. आता 31 जानेवारीला ब्रिटन यूरोपीय संघाच्या बाहेर पडणार आहे. चार वर्ष चाललेल्या संघर्षानंतर बुधवारी यूरोपीय यूनियनच्या संसदेने 49 विरूद्ध 621 अशा बहुमताने ब्रेक्झिट करारावर शिक्कमोर्तब केले. या कराराला ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मागील वर्षाच्या शेवटी ईयूच्या 27 अन्य नेत्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर अंतिम रूप दिले होते. आता प्रश्न असा आहे की, याचा भारतावर कोणता परिणाम होणार ?
यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रिटनमध्ये 800 पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आहेत, ज्या 1,10,000 लोकांना रोजगार देतात. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक हे टाटा समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये काम करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनची करन्सी पाऊंडमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे ब्रिटनमधील भारतीय कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
काय आहे ब्रेक्झिट
ब्रिटनने जून-2016 मध्ये जनमत घेतल्यानंतर ब्रेक्झिटला मंजूरी दिली होती. परंतु, ब्रिटन अजूनही या वर्षाच्या शेवटपर्यंत ईयूच्या अर्थव्यवस्थेमध्येच राहणार आहे, मात्र निर्णय प्रक्रियेत तो दखल देणार नाही, आणि ईयूचा सदस्यही नसेल.
ब्रेक्झिटचा परिणाम
(1) यूरोपीय यूनियनच्या जीडीपीमध्ये ब्रिटनचा सहभाग 18 टक्के आहे. भारताच्या विकासात यूरोप आणि ब्रिटन दोघांचीही महत्वाची भूमिका आहे. यूरोप आणि ब्रिटनच्या निर्यातीमधून भारताला मोठे परकीय चलन मिळते.
(2) यूकेच्या अंतरराष्ट्रीय व्यापार विभागानुसार (डीआयटी), 2017 मध्ये भारत आणि यूकेमध्ये एकुण 18 अरब पाऊंडचा व्यापार झाला, जो 2016 पेक्षा 15 टक्के अधिक आहे. भारतीय कंपन्यांमध्ये झालेल्या मोठ्या बदलाने जागतिक स्तरावर व्यापाराची व्याख्या बदलली आहे.
(3) भारत यूकेमध्ये गुंतवणूक करणारा तिसरा मोठा देश आहे. याशिवाय द्विपक्षीय व्यापर करणार्या देशांमध्ये ब्रिटन 12व्या नंबरवर आहे. ब्रिटन त्या 25 देशांमध्ये 7 व्या नंबरवर आहे, ज्यांच्याकडून भारत सामान कमी घेतो आणि जास्त पाठवतो.