मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूरमधील कागल येथील घरांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यावर भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Kirit Somaiya)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लाडके हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं होतं. पण, मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं आहे, की सर्व घोटाळेबाजांचा हिशोब घेऊनच राहणार आहे. अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसोबतच शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे.
हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रूपयांचे कंत्राट जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिले होते. सरसेनापती कारखान्याच्या माध्यमातून जवळपास १५८ कोटी रूपयांचे मनी लाँड्रींग करण्यात आलं. या सर्वांचा आता हिशोब होत असल्याचे यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.
नेमके काय आहे हे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते.
२०२० साली आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स कंपनीला चालवायला देण्यात आला होता.
त्यात पारदर्शक पध्दतीने व्यवहार झाला नसल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केले होते.
तसेच संबंधित ब्रिक्स कंपनीला कारखाना चालविण्याचा कुठलाही अनुभव नसताना देखील हे कंत्राट त्या
कंपनीला देण्यात आले. त्यावर किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर त्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya on hasan mushrif home ed raid
हे देखील वाचा :
Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…
Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा तपास यंत्रणांना सल्ला; म्हणाले…